ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा
महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी मोठी बातमी! ई-केवायसी पूर्ण न केल्यास ऑक्टोबरपासून पगार थांबणार; २० सप्टेंबर अंतिम मुदत
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीवरील ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास ऑक्टोबरपासून वेतन रोखण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
शिक्षणापासून क्रीडेपर्यंत आधुनिकतेचा ध्यास; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडून शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्राला नवे बळ!
शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करतानाच महाराष्ट्राच्या पारंपरिक खो-खोला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. सुनेत्रावहिनी पवारांच्या उपस्थितीत शिक्षण, AI तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्राच्या डिजिटल सक्षमीकरणावर भर देण्यात आला.
भारत पुन्हा साखर आयात करणार! १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवून वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे.
एअरटेलनंतर आता जिओ ग्राहकांना मोठा झटका? रिचार्ज प्लॅन्स महागण्याची शक्यता
एअरटेलने काही लोकप्रिय प्रीपेड प्लॅन्स बंद केल्यानंतर आता रिलायन्स जिओच्या ग्राहकांमध्येही दरवाढीची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात प्रीपेड रिचार्जच्या किमती वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सर्पदंशाविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित; प्रत्येक घटना अन् मृत्यूची नोंद बंधनकारक
महाराष्ट्र सरकारने सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ घोषित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सर्पदंशाच्या संशयित, संभाव्य आणि निश्चित घटनांसह मृत्यूची माहिती आरोग्य यंत्रणेकडे नोंदवणे रुग्णालये आणि डॉक्टरांसाठी बंधनकारक असणार आहे.
मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत मोठी माहिती समोर; ७५.५२ लाख मतदार ‘Absent’, १७.६३ लाख दुबार नोंदी
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी प्रक्रियेत ७५.५२ लाख मतदार ‘Absent/Not Found’, तर १७.६३ लाख नोंदी ‘Duplicate/Enrolled Elsewhere’ म्हणून चिन्हांकित झाल्या आहेत.